रविवार 29 ऑगस्ट 2010

माझे काका आणि बैल

                  कधी कधी माणूस उस्फूर्त पने एखादे सामान्य कार्य करून जातो परंतु नंतर विचार केल्यावर तो खूप विचित्र वाटते. असेच एकदा मी माझ्या चुलत बहिणीच्या लग्नाला नाशिकला गेलो होतो. भरपूर वेळ असल्यामुळे मी चार पाच दिवस आधी गेलो होतो. तेवढाच लग्नाच्या घरात कामालाही मदत होईल म्हणून.
                    एक दिवस मी काका काकू बरोबर बाजारात गेलो. भाजी बाजार होता तो. मी आपल्या पिशव्या घेवून मागे मागे चालत होतो. अचानक मागून आरडा ओरडा सुरु झाला. मी घाबरून मागे वळून पहिले एक भला मोठा बैल भर बाजारात घुसला होता. आणि आता तो आमच्याच दिशेने येत होता. मी आपला एक कोपरा शोधून दबकून अंग चोरून पिशव्यांची ढाल करून उभा राहिलो. ह्या अपेक्षेने कि बैल आपला सरळच जाईल. नाहीतरी माझ्या माहिती प्रमाणे बैल लोक हे अगदी नका समोर सरळ चालत असतात. त्यानंतर माझे काका गर्दी मध्ये स्वतःला सावरत बाजूला झाले. मग तो बैल निघाला आमच्या काकुच्या दिशेने. काकुच्याही हातात पिशव्या वगैरे होत्या. त्यांची घाबर गुंडी उडाली. त्यांना ऐन वेळेस लपायला कोठेच जागा सापडेना त्यांनी आरडा ओरड सुरु आणि हे दृश्य पाहून माझ्या काका मधील "धर्मेंद्र" जागा झाला. आता काकू पुढे त्यांच्या मागे बैल आणि बैलाच्या मागे काका असं भयानक दृश्य पाहून मी सुद्धा हातातील पिशव्या वगैरे फेकून दिल्या आणि माझ्या अंगात सलमान खान आणण्याचा बराच प्रयत्न केला परंतु अडचण अशी होतीकी अंगात सलमान आणायचा म्हणजे शर्ट चे बटन काढायला वेळ हवाना तेवढा. ह्या अश्या आणीबाणीच्या परिस्थितीत तेवढा वेळ कुणाकडे? त्यामुळे तो बेत रद्द करावा लागला.
                   मग बघता बघता माझे काका बैलाच्या पुढे गेले तो पर्यंत काकू सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबल्या होत्या परंतु आता खूप उशीर झाला होता म्हणजे माझे काकांनी बैलाच्या समोर येवून दोन्ही हाताने त्याची शिंगे पकडली होती. अश्या पद्धतीने ते अभिमन्यू प्रमाणे चक्रव्ह्युव मध्ये अडकले होते कारण एकदा बैला चे शिंग पकडले म्हणजे आता परिस्थिती अशी झाली कि शिंगे सोडली तर तो बैल शिंगे मारणार आणि नाही सोडली तर त्या बैलाच्या शक्ती समोर आमच्या काका ची काय बिसात तो त्यांना अगदी सहज पने फरफटत न्हेत होता. अरेबापरे मी म्हणालो अरे आता हा तर दुसरा खेळ सुरु झाला. मला काका वरच राग यायला लागला होता. कारण माझ्या मते त्यांनी काकूला वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा डायरेक्ट बैलाशीच पंगा घेतला होता. "मी म्हणतो काय गरज होती", असं विचारवं जाऊन त्यांना. पण मी म्हटलो आत्ताच नको कारण आता ते "बिझी" आहेत.
                      शेवटी त्यांनी चलाखी दाखवली (म्हणजे काय? दुसरा पर्यायाच नव्हता, दाखवावीच लागली ) आता भाजी बाजारात दोन दोन फुटाच्या उंचीचे ओटे बनलेले असतात आणि दोन ओट्या मध्ये काही अंतर असतो. अशे दोन चार ओटे त्यांनी बैला बरोबर फुकटात पार केले होते (कारण आमच्या गल्लीत उंटा वाला येतोना मुलांना चाकर मारायला तो साला पैशे घेतो) त्यांनी आजूबाजू चे अवलोकन केले आणि अश्याच दोन ओट्या मधल्या मोकळ्या जागेत आल्यानंतर त्यांनी अत्यंत चलाखीने स्वतःला बाजूला झोकून दिले. आणि अश्या पद्धतीने या दोन्ही खेळावर पडदा पडला. आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला.
                           परंतु या गोष्टीचा मी भलताच धसका घेतलाय. त्या मुळे त्याचा माझ्यावर वाईट परिणाम झालाय. होत काय कि आता जेंव्हा कधी मी माझे ते काका आणि बैल एकत्र पहातोना तर मी मूर्च्छा येवून पडतो. बरं गोष्ट इथे संपत नाही कारण एकदा मी असेच दुसर्या (त्यांच्या पेक्षा मोठे) काकांच्या घरी गेलो होतो. काका काकू माझी चुलत भाऊ बहिणी आम्ही सर्व जन गप्पा मारत बसलो होतो. सहज विषय निघाला आणि ह्या गोष्टीची आठवण निघाली तर मी सविस्तर पने हि कहाणी सांगत होतो सगळे पोट धरून हसत होते परंतु माझ्या लक्षात आले कि माझे काका थोडे गंभीर झाले होते, मी म्हटलो अरे बापरे यांनी मनावर घेतला कि काय? त्यांच्या भावावर सार्वजन असे हसतायत म्हणून. सर्वजन त्यांना पाहू लागले. थोडा अवकाश घेवून त्यांनी तोंड उघडले. ते म्हणाले "अरे तो होत म्हणून असे घडले, त्याला काय जमतंय? मी असतोना ....तर त्या बैलाला सहज हरवले असते मी" (आता बोला)

जहीर सय्यद

0 टिप्पणी(ण्या):